काश्मीरमध्ये त्याचवेळी कारवाई केली असती तर दहशतवाद संपला असता   

पंतप्रधान मोदी यांचे मत

गांधीनगर :  पाकिस्तानने बळकावलेला व्याप्त काश्मीर सैन्य कारवाई करुन ताब्यात घ्या, असा सल्ला १९४७ मध्ये तत्कालीन गृहमंत्री, सरदार वल्लभभाई पटेल यांनी माजी पंतप्रधान पंडित नेहरु यांना दिला होता. मात्र, तो नेहरु यांनी ऐकला नाही. उलट मुद्दा संयुक्त राष्ट्रात नेला, सैन्य कारवाई तेव्हाच केली असती तर दहशतवादाचे समूळ उच्चाटण झाले असते, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी सांगितले. 
 
गांधीनगर येथे गुजरातच्या शहर विकासाची २० वर्षांची गाथा हा कार्यक्रम मंगळवारी आयोजित केला होता. त्यावेळी  पहलगाम दहतवादी हल्ला, ऑपरेशन सिंदूर कारवाईच्या पार्श्वभूमीवर मोदी बोलत होते. फाळणीमुळे देशाचे प्रचंड नुकसान झाले, असे सांगताना ते म्हणाले, अगोदर भारत आणि पाकिस्तानामुळे देश दोन तुकड्यांत विभागला गेला. १९४७ मध्ये पाकिस्तानने व्याप्त काश्मीर बळकावला. त्यामुळे देशाचे तीन तुकडे झाले. 
 

Related Articles